या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच मिळेल शेतकऱ्यांनी ५० हजार रु.

कोणत्या शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच ५१ रुपयांचा लाभ मिळणार आहे या संदर्भात आपण आज या लेखात माहिती जाणून घेवूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जून २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती . महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच मिळेल शेतकऱ्यांनी ५० हजार रु. त्या बँक खालीलप्रमाणे

  • खाजगी बँका.
  • राष्ट्रीयकृत बँका.
  • ग्रामीण बँका.
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.
  • विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था.

हेही वाचा सौर उर्जा कुंपण योजना ७५ टक्के अनुदान

खालील वर्षाप्रमाणे लाभ दिला जाणार आहे.

एखाद्या शेतकऱ्याने जर २०१७-१८ या वर्षात अल्पमुदत पिक कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज दिनांक ३० जून २०१८ पर्यंत पूर्णपणे त्या शेतकऱ्याने फेडलेले असावे.

शेतकऱ्याने जर २०१८-२०१९ या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ या दिनांक पर्यंत पूर्णपणे फेडलेले असेल तर असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.

२०१९- २० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास शेतकरी ५० हजार प्रोत्साहनपर योजनेस पात्र ठरणार आहेत.

२०१९-२०  या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५०  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.

दिनांक 22 जून रोजी झालेल्या मंत्रीमंडळ निर्णय संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही शासनाच्या महासंवाद या वेबसाईटला भेट देवू शकता किंवा शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment