अतिवृष्टी अनुदान आले याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

राज्यात विविध जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान आले असून त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते.

बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.

त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

या संदर्भात माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

आणखी कामाची योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार मिळणार बिनव्यजी कर्ज

अतिवृष्टी अनुदान आले शेतकऱ्यांना मिळणार लाभ

राज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी शासणे अनुदान मंजूर केले आहे.

या शेतकऱ्यांना आता दुपट्टीने आर्थिक मदत मिळणार आहे असे शासणे जाहीर केले आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 त्यानुसार पुणे आणि औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्यामार्फत निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

हे अतिवृष्टी अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची यादी खाली दिलेली आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान आले.

  • औरंगाबाद विभागातील जिल्हे

औरंगाबाद

जालना

परभणी

हिंगोली

नांदेड

बीड

लातूर

  • पुणे विभागातील जिल्हे

पुणे

सातारा

सोलापूर

अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार

लाभार्थींना नुकसानभरपाईपोटीची रक्कम थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करण्यात येणार आहे.

शेतकरी लाभार्थींना मदत वाटप केल्यानंतर लाभार्थींची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता, शेतीपिकांच्या नुकसानीपोटी विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्याबाबतचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाले होते.

त्यानुसार मदतीचे वाटप करण्यासाठी ३९९५ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वाढीत दराने मिळणार नुकसान भरपाई

जिरायत पिकांच्या नुकसानीभरपाई पोटी पूर्वी प्रति हेक्टर ६८०० रूपये आणि दोन हेक्टरची मर्यादा होती. ती आता १३६०० प्रति हेक्टर करून तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढविली आहे.

बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर १३५०० रूपयांवरून २७ हजार रूपये केले आहेत. बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी १८ हजार रूपयांवरून ३६ हजार रूपये देण्यात येणार आहेत.

ही मदत राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी लागू असेल.

अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये २४ तासात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असल्यास आणि मंडळामधील गावात ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास मदत अनुज्ञेय असणार आहे.

Leave a comment