हेक्टरी 15 हजार प्रोत्साहन मिळणार अनुदान निधी आला

शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. हे अनुदान बोनसच्या स्वरुपात असणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यानी दिली आहे. यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहायता मिळणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत 1 हजार कोटी रुपयास वितरित करण्याची मान्यता देण्यात आली त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवरकच हे अनुदान मिळणार आहे.

या संदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

आता लवकरच शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार अनुदान मिळणार आहे त्यासाठी निधी वितरित झाला असून पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

हेक्टरी 15 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार

अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना या नुकसानीमधून सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ज्या शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळालेली नाही त्या शेतकरी बांधवाच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा करावी असे निर्देश दिले आहेत.

1 कोटी रुपये खर्च वितरित करण्यास मिळाली मान्यता

राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती.

२०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.

ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.

मागील म्हणजे २०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती.

पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती.

या पूर्वीच्या खरीप हंगामामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे

मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या.

ज्या शेतकऱ्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले.

तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment