सिंचन विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार

महात्मा गांधी रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना खूप दिवसापासून राबविण्यात येत आहे त्यामध्ये सिंचन विहिरीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहे त्या शेतकऱ्यांना आता १५ ऑगस्ट पर्यंत अनुदान वितरीत करण्यात येणार आहे याबाबत माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रथम ३ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते

आता त्यात वाढ करून शेतकऱ्यांना ४ लाख अनुदान देण्यात येते.

हे देखील वाचा ; नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप मिळणार GR

सिंचन विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांना लवकरच मिळणार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित करण्यात येईल,

असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींना मंजुरी मिळण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आकाश फुंडकर, राजेश टोपे, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की

मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहीर अनुदानात तीन लाख रुपयांवरुन चार लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

या विहिरींच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत फेर भूजलसर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून फेर भूजलसर्वेक्षण करून प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येईल.

तसेच धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ज्या विहिरी मंजूर झाल्या होत्या,

त्यांचा निधी वितरित करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री.भुमरे यांनी यावेळी सांगितले.

रोजगार हमी मधून राबविली जाणार विहीर अनुदान योजना सुरु.

या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

केवळ विहीर दिली म्हणजे झाले असे देखील नाही.

विहीर असेल आणि त्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी पंपच नसेल तर शेतकरी कसा लखपती होणार.

त्यामुळे विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीतील पाणी उपसा उपसा करण्यासाठी शेतकरी बांधवाना पंप शक्यतो सोलर पंप देण्यात यावा असा देखील उल्लेख या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे.

शेतकरी लखपती व्हावा यासाठी त्यांना तुषार ठिबक सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अस्तित्वातील विहिरीपासून ५०० मीटर अंतरावर विहीर खोदण्याच्या नियमात देखल बदल करण्यात आला असून आता १५० मीटर करण्यात आलेली आहे.

परंतु हा नियम ठराविक बाबींसाठीच लागू असणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment